वधु :
ताटात वाढला आहे भात,
ताटात वाढला आहे भात,
आज पासून शिरीषला माझी साथ.
वर:
घेतले मी आज फेरे ७,
घेतले मी आज फेरे ७,
आता पासून मी रियाच्या तुरुंगात.
—- विशाल गडकरी
|
||||||
|
वधु : ताटात वाढला आहे भात, वर: घेतले मी आज फेरे ७, —- विशाल गडकरी ३ महिन्यांचा कालांतरा नंतर आमच्या ग्रौप ने ट्रेक करायचा ठरवले . खूप उष्ण वातावरण असल्या मुळे, गर्मीत आम्ही ट्रेक नाही केले .पाऊसात ट्रेक करायला सर्वांना आवडतं म्हाणून आम्ही कर्नाळाला जायचा ठरवलं. तारीख ठरली २७ जून २०१०. ![]() Image Courtesy - trekshitiz.com ठाणे ते पनवेल ट्रेन ने जायचं आणि सकाळी ६ वाजता ठाणे स्टेशन वर भेटायचा ठरेल. ६.२४ ची लोकाल होती आणि आम्ही जरा आधीच भेटलो. एक मित्र यायचा बाकी होता ज्याच्या कडे सर्वांचे तिकीट होते. ट्रेन ला पिवळा सिग्नल मिळालेला होता आणि त्याचा कुठे पत्ता नव्हता. आम्ही ट्रेन मधून उतरण्याचे ठरवले एव्ड्यात तो धावत आला. तो जसा ट्रेन मध्ये चढला , तशी ट्रेन निघाली.
ट्रेकचा खर्च १५० रु प्रती व्यक्ती आस ठरवला होता. ह्या ट्रेकला आम्ही एकूण १७ जण होतो. ७.१५ ला आम्ही पनवेलला पोहचलो. सर्वांना भूक लागली असल्या मुळे आम्ही पनवेल एस . टी स्टेन्ड जवळ असलेल्या एका हॉटेल मध्ये नाश्ता केला. अलिबागला जाणारी बस कर्नाळा वरून जाते म्हाणून आम्ही ८.१० ला बसची विचारपूस केली, तेव्हा कळले क बस ८.३० ला आहे. बस यायला वेळ होती म्हाणून मी आणि प्रवीण कर्नाळाला जाणार्या टमटमची (६ सीटर) विचारपूस करायला गेलो. तेव्हा कळले की एक टमटम कर्नाळाला जायचे १५० रुपये घेते. आम्ही १७ जण होतो म्हाणून आम्ही २ टमटम घेतल्या. पनवेल – कर्नाळा मधील अंतर १४ कि.मी आहे. ३० मी. मध्ये आम्ही कर्नाळा ला पोहचलो.
कर्नाळा, पक्षी अभयारण्यासाठी सुधा प्रसिद्ध आहे, त्या मुळे तेथे बरीच लोक येतात. कार पार्किंग साठी सुधा जागा आहे. प्रति व्यक्ती २० रु प्रवेश शुल्क आहे. प्लास्टिक बाटल्या जर आपल्या जवळ असतील तर १०० रु दिपोझीट ठेवाव लागतात. जेव्हढ्या बाटल्या घेऊन जातोय तेव्हढ्या बाटल्या येताना असतील तर १०० रु ते परत देतात.
किल्ल्याचा रस्ता पक्षी अभयारण्यातून आहे. आम्ही जेव्हा ट्रेक सुरु केला तेव्हा पहेले १०-१५ मिनिट डांबरी रस्त्यावरून चालत होतो. खरा ट्रेक तेव्हा सुरु झाला जेव्हा आम्ही डांबरी रस्ता सोडून झाडाझुडुपात लपलेल्या पाय वाटेवरून चालायला सुरु केले. तेथे वेगवेगळी झाड सुद्धा आहेत ज्यांचावर त्यांची नावं लिहिलेली सापडतात. किल्ला चढणं काही कठीण नाही आहे फक्त काही ठिकाणी लाल माती आहे जी थोडी घसरडी आहे. वेगवेगळ्या प्रकारची किडे पण तेथे सापडतात. आम्ही थांबत आणि मस्ती करत जात होतो म्हणून आम्हाला २ तास किल्ला चढायला लागले. किल्ल्याचा आंत जायला जिने आहेत. किल्ल्या वरून प्रबळगड , इरशाळगड आणि माथेरान चा दर्शन होत. किल्ल्याचा इतिहास फार छान आहे . इतिहास विकिपीडिया तून वाचा.
किल्ला चढताना पाऊसाने बिलकुल हजेरी लावली नाही. किल्ला चढल्यावर सुद्धा आजुबाजूच्या परिसरात पाऊस दिसत होता पण किल्ल्यावर मात्र सगळी जण पाऊसा साठी तरसली होती. आम्ही जेवण सुरु करणार तेव्हढ्यात पाऊसाने हजेरी लावली. पाऊस येताना जोरदार वार्याला घेऊन आला. आम्ही पाऊसातच जेवायचं ठरवले. त्या जागेवर आम्ही १ तास आराम केला आणि मग रुश्मीने किल्ल्याचा इतिहास सांगितला. उतरताना मात्र आम्हाला पाऊसाने बरेच वेळा भिजवलं. दीड तासात आम्ही खाली उतरलो आणि पिंजर्यात असलेल्या पक्षांना बघायला गेलो. पिंजर्यामध्ये मोर , बदक , ससा , पोपट , होते. मोर आपला पिसारा फुलवून गोल गोल फिरत होता. सर्वजण त्याचे फोटो काढत होते. बदक शिंकत आणि जांभळी देत होता. मग तिकडून आम्ही प्रवेश द्वारावर गेलो आणि घेऊन गेलेल्या प्लास्टिक बाटल्या दाखवून दिपोझीट दिलेले १०० रु परत घेतले.
पनवेल ला जायला २ परियाय आहेत , पहेला म्हणजे टमटम चालकाचा फोने नंबर घेऊन ठेवणे ज्या टमटमने आपण आलो आणि जाईचा वेळी त्याला फोने करून बोलावणे, टमटमवाले अशा वेळी ५० रु अधिक मागतात म्हणजे जाताना ते २०० रु १ टमटम आणि दुसरा मार्ग म्हणजे अभयारण्याच्या बाहेर पनवेलच्या दिशेने जाणार्या बसची वाट बघायची. आम्ही टमटम वाल्याचा नंबर घेतलेला होता पण त्याचा फोने बंद होता म्हणून आम्ही बसची वाट पाहत उभे राहिलो. अलिबागच्या दिशेने जाणार्या रस्त्यावर एका अपघाता मुळे वाहतूक ठप्प झाली होती. कोणतरी मला सांगितले के अपघात जवळच झाला आहे म्हणून मी आणि सिद्धेश माझा कॅमेरा घेऊन त्या देशेने गेलो. परत येताना प्रविण भेटला आणि बोलला के १२ जण एका ६ सीटर ( आता ६ सीटर बोलणे बरोबर नाही ) मधून पुढे गेले आणि आम्ही फाकते ५ जण आता उरलो आहोत. वाहतूक परत सुरळीत होयला सुरवात झाली होती म्हणून आम्ही बस किव्हा टमटमच्या शोधात पळालो. नशिबाने आम्हाला एक बस मिळाली जीने आम्हाला पनवेल एस . टी स्टेन्ड जवळ सोडलं. आम्हाला ६.१८ ची पनवेल – ठाणे ट्रेन मिळाली. जेव्हा आम्ही एकूण झालेला खर्च काढला तेव्हा सर्वांना आश्चर्य झाला कारण एकूण खर्च फक्त १०० रु प्रति व्यक्ती झाला होता. ७.१५ ला आम्ही ठाण्यात पोहचलो आणि पुढच्या ट्रेकला नक्की परत सर्व जण भेटू आशी हमी दिली.
कर्नाळा पक्षी अभयारण्या बद्दल अधिक वाचा. ![]() The Trek Group कर्नाळाला कसे जायचं ठाणे ते पनवेल तिकीट भाडे १४ रु . एस . टी स्टेन्ड स्टेशन पासून ५ मिनिटच्या अंतर वर आहे. अलिबाग ला जाणार्या एस . टी कर्नाळा वरून जातात. कर्नाळाला जाणार्या टमटम गांधी हॉस्पिटलच्या समोर उभ्या असतात. एस . टी स्टेन्ड पासून ५ मिनिटांच्या अंतरावर आहे . पनवेल ते कर्नाळा टमटमवाले १५० रु घेतात. टमटमवाल्याचा फोने नुंबर घेऊन ठेवा येताना उपयोगी ठरेल. येताना टमटमवाले २०० रु भाडे घेतात (एकदा टमटमवाल्या बरोबर बोलून खात्री करून घेणे ) कर्नाळा ते पनवेल मुंबई मधल्या रिक्षांची दरवाढ २४ जुन २०१० पासुन लागु झाली. नविन दरवाढीचे फलक व कोणत्याही रिक्षाचालकाने जर कोठेही येण्यास नकार दिला तर त्याची तकरार करण्याकरीता दुरध्वनी क्रमांक फलक वर दिलेला आहे.
रिक्षा दरवाढ फलक डाऊनलोड करा आज तुझा माझा साथ नाही, मुंबई चमकत्या सिनेतारकांची स्वप्नं पाहणाऱ्या एका राजाराणीची अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या घातपाताची फुटपाथवर बसणाऱ्या विक्रेत्यांची गुजराथी मारवाडी व्यापाऱ्यांची मुळ कविता - मी मराठी
पावसाळा सुरू झाला की मला घरी बसायला, ऑफिसला जायला खुप कंटाळा येतो. मजा येते ती फक्त पावसात भिजायला, ट्रेकिंगला जायला आणि बाइक फिरवायला. ट्रकिंग आणि भिजण्याचा आनंद तर दर वर्षी घ्यायचो, पण बाईकवर फिरण्याचा आनंद तेव्हढा लुटता आला नाही कारण माझ्याकडे तेव्हा बाईक नव्हती. पावसात बाईक चालवायची मजा काही वेगळीच आहे. पण काल मी ती मजा अनुभवली, मजा कसली थ्रिल होती ती. माझं ऒफिस कांदिवलीला आहे, त्यामुळे मी दररोज कांदिवली – ठाणे असा बाईकने प्रवास कारतो. साधारणता एक – सव्वा तासाचा प्रवास आहे तो. घोडबंदर रोड हा सोइस्कर असल्यामुळे मी नेहमी तीकडुनच ये जा करतो. (घोडबंदर – दहिसर- बोरीवली – कांदिवली). एक मित्र मुलुंड वरुन अजुन ऐका मित्राला घेऊन येतो. असे ते दोघे एका बाईकवर तो आणि मी ऐकटा माझा बाईकवर आम्ही ऐकत्र ऒफिसला जातो. सकाळी ऒफिसला जाताना आम्हाला पाऊस लागला ज्याचा आम्ही पुरेपुर आनंद लुटला. पावसात घोडबंदर रोड खुपच छान दिसत होता. घाटा सारख्या नागमोड्या रस्त्यावर ३०-४० कि प्रति तासाच्या वेगात बाईक चालवायला खुप मजा येत होती. तोच आनंद घेत घेत आम्ही ऒफिसला पोहचलो. संध्याकाळी आम्ही निघायचा आधीच पुन्हा पाऊस पडायला सुरवात झाली होती. तेव्हा पाऊस रीमझिम रीमझिम पडत होता, पण पाऊस धुवादार येणार याचा अंदाज आम्ही आभाळा कडे बघुन लावला होता. १० मिनिटातच आमचा आंदाज खरा ठरला. पावसाने आपला जोर वाढवला. धुवादार पावसाला जोर दार वार्याची साथ होती. बाईकचा वेग कमी होता तरी पण बाईक आवरायला कठीण जात होतं ज्याच पुर्ण श्रेय जोरदार वार्याला जातं. जसं जसं आम्ही पुढे जात होतो तसं तसं आमच्या साथीत कोणा ना कोणाची भर पडत होती. बोरिवली मध्ये पोहचे पर्यंत काळोखाची साथ मिळाली. पाऊसामुळे अंधुक झालेल्या रस्त्यावर अंधारा मुळे गाडी चालवण फारच कठीण जात होतं. त्यात जागो जागी पाणी भरायला सुरूवात पण झाली होती. बरेच वेळातर अंदाजा वर पण गाडी चालवली. दररोजचा रस्ता होता म्हणुन हे अंदाज घेऊन चालवण्याची रिस्क घेतली. दहिसरला असताना ज्या गोष्टीची भीती होती ती चमकली, महणजे वीज. मनात म्हणटल याचीच कमी होती. ह्वदयाचे ठोके आता वाढले होते. पाऊसात भिजण्याचा आनंद आता काही मिळत नव्हता. मनात अता थोडी भीती पण होती. दहिसर चेक नाका ते रेती बंदर हा रस्ता घाटा सारखा आहे व त्या पुर्ण रस्त्यावर लाईट पण नाही आहेत. मन एवढच बोलत होत की तो रस्ता पटकन संपायला हवा. आता काळोख पण वाढला होता त्यामुळ रस्ता दिसायला जास्ती त्रास होत होता. बाईकच्या लाईटची जास्ती काही मदद होत नवती. हेलमेटच्या काचेवर आदळणार्या पाऊसाच्या थेंबांन मुळे हा त्रास होत होता. हेलमेटची काच जर ऊघडली तर तो मारा डोळ्यांन वर होत होता. पण येथे फायदा होता रस्ता माहीत असल्याचा. कोठे वळण आहे, कोठे चढण आहे याचा अंदाज अचुक लागत होता. बरेच वेळा पुढच्या गाडीच्या टेल लाईट ने अंदाज घ्यायला लागायचा. पण जेव्हा वीज चमकायची तेव्हा खुप भीती वाटायची. जेव्हा रेती बंदरच्या वळणावर गाडी पोहचली तेव्हा माझ्या जीवात जीव आला. आत काही भिती नाही हे नक्की होतं कारण ठाणे शहरात प्रवेश झाला होता आणि त्या पुढच्या रस्त्यावर लाईट पण होते. परत पाऊसाचा आनंद घ्यायला मी सुरूवात केली होती. माझ्या चेहर्यावर आनंद परत दिसुलागला होता. जेव्हढा सुंदर प्रवास आमचा सकाळी होता, तेव्हढाच भयंकर तो पावसाळी रात्री होता. जी मजा मला अनुभवायची होती ती अशी अनुभवीन याचा विचार पण नाही केलेला. चूकुन चूकलो, जो चूकेल त्याला नका ओरडू, जो जेवढा जास्तं चूकतो, चूका मुद्दाहुन नाही होत,
आपण अशा राष्ट्रात राहतो जेथे जेथे पिझ्झा अग्निशामक दल, पोलिस आणि आंब्युलेन्स पेक्षा लवकर पोहचवीला जातो. जेथे कार लोन ५% आणि एजुकेशन लोन १२% व्याजा वर दिलं जातो. जेथे तांदुळ ४०/- प्रति किलो आणि सिम कार्ड बिना मुल्य मिळतं जेथे करोडपती दान धर्म करण्या ऐवजी एक क्रिकेट संघ विकत घेतो. जेथे बुट-चपला वातानुकुलित दुकानात मिळता आणि भाज्या रस्त्यावर जेथे सर्वांना प्रसिद्धि हवी आहे, पण कोणालाच कष्ट करुन प्रसिद्ध व्हायचे नाही आहे. जेथे लिंबू सरबत कृ्त्रिम स्वाद घालुन बनवलं जातं आणि लिक्विड डिश वॉश मध्ये अस्सल लिंबाचा रस वापरला जातो. जेथे लोकं चहाच्या टपरी बाल कामगारांनवर लिहिलेला लेख वाचतात आणि बोलतात “लाहान मुलांनकडुन काम करुन घेणार्याला फाशी द्यायला हवी” आणि नंतर हाक मारतात “अरे छोटु २ कटींग आण” संदर्भ : ईमेल |
||||||
|
Copyright © 2010 रगडा पॅटीस - All Rights Reserved |
||||||